एमआयडीसी मे महिन्यात बारवी (जांभळा) जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ७ मे रोजी दुपारी १२ ते ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, तसेच २१ आणि २२ मे रोजी दुपारी १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहील.
याशिवाय, ९ मे आणि २३ मे रोजी पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Views: 45



