जन घोष वार्ता प्रतिनिधी: अडीच लाखांखालील उत्पन्न असलेल्या महिलांसाठीची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये सुरूच राहतील. गैरपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, योजना बंद होणार नाही.” तसेच आतापर्यंत 50 लाख ‘लखपती दीदी’ तयार केल्याचे आणि आणखी 50 लाख तयार करण्याचेही ते म्हणाले.
Views: 88



