रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग अॅक्शनला रिअॅक्शन होणारच…रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले. तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.
Views: 101



